...तरच हे शक्य आहे

  164

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मराठी माणसांना साद घालणारे पत्र


मुंबई : २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या लोकांना शुभेच्छा देत लोकांना पत्र लिहिले आहे. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवे. हे स्वप्न वास्तवात यावे, अशा शुभेच्छा राज यांनी पत्रातून दिल्या आहेत.


मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचे जतन यासाठी नेहमी राज ठाकरे अग्रेसर होते. मराठी भाषेला जपण्याची सुरवात ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मराठी भाषेबद्लचा त्यांचा लढा आता राज ठाकरे पुढे नेत आहे.





राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी भाषेविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम दाखवून दिले. एवढंच काय तर प्रत्येक मराठी माणसाला मराठी आली पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला. मराठी भाषा जपण्यासाठी, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.


व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी असायलाच हवी, असं त्यांचं ठाम मत होतं त्यासाठी त्यांनी अनेकदा ठोस पावले उचलली. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न आहे, असे राज ठाकरे नेहमी बोलतात.


सर्व दुकानं, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक अर्थात पाट्या या मराठीत असाव्यात, असा त्यांचा नेहमी आग्रह होता व आहे. मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाला त्याचे सर्व हक्क मिळायला पाहिजे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.



राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे...


सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा


कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हांच्या सरकारने कुसुमाग्रज जयंती २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरुपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळे सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरारीने पुढे आलेला नाही आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरू आहे त्यात कुणी येईल अशी शक्यता वाटत नाही.


असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभे राहावं लागणार आहे. हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी. प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये. दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात पण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण मराठी एकत्र असू तर सर्वत्र मराठी करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.


मी माझ्या विकास आराखड्यात म्हणले आहे तसं मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवं हे स्वप्न वास्तवात यावं ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा..!


आपले नम्र
राज ठाकरे

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर