कोकणातही गोशाळा निर्माण करणार- केंद्रीय मंत्री नारायण राणे

कोल्हापूर: कोल्हापूर येथील कणेरी मठाच्या धर्तीवर कोकणात देखील गोशाळा निर्माण करण्याचा आपला विचार आहे. मी स्वतः तब्येत ठीक नसताना देखील केवळ या लोकोत्सवातून ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सुरु असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात आपले मनोगत व्यक्त केले.


ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये तसेच प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा सोहळा मार्गदर्शक ठरणार आहे. गेल्या सात दिवसांमध्ये या ठिकाणी लाखो नागरिक येऊन गेले. इथं आलेला प्रत्येक माणूस काही ना काही चांगलं शिकून बाहेर पडला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सुरु असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनात कणेरी मठात हा पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील लाखो नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थिती लावली. या महोत्सवातून पर्यावरण रक्षण तसेच सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.

Comments
Add Comment

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

पुण्यात मेट्रोच्या आणखी दोन उपमार्गिकांना शासनाची मान्यता

मुंबई : पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, कोणाला मिळणार फायदा?

मुंबई : राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष; शासन शेतकऱ्यांसोबत मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३