कोकणच्या लाल मातीत पिकतेय लालबूंद, रसरशीत स्ट्रॉबेरी

सिंधुदुर्ग: कोकणात तुम्ही भात पिकताना पाहिलं असेल. काजू, कोकम, आंबे म्हणजे कोकणचं वैभव पण पण कोकणात स्ट्रॉबेरी शेती शक्य आहे का? तर याचं उत्तर हो आहे.


लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवत ते महाबळेश्वर. गेल्या तीन वर्षांपासून तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जांत आहे. या शेतकऱ्याने तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.


जोश कर्णाई असं या शेतकऱ्याचं नवा. मूळचे केरळचे असलेले कर्णाई हे कामानिमित्त मुंबईत आले होते. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तळकोकणात शेती घेतली. या शेतीत ते अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात त्यांनी सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे.


जोश कर्णाई हे अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्ष स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना २५ किलो उत्पन्न मिळतं. सुरुवातीला त्यांना ७०० रुपये प्रति किलो दर मिळाला. सध्या हा दर २५० रुपये आहे. स्थानिक सावंतवाडी बाजारपेठेसह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीला मागणी आहे.


कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात स्ट्रॉबेरीची शेती शक्य झाली आहे कारण, घारपी गावातील वातावरण स्ट्रॉबेरी शेतीसाठी पूरक आहे. हनुमंत गडाच्या अगदी पायथ्याशी स्ट्रॉबेरीची ही शेती असल्याने पर्यटक देखील या स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देत स्ट्रॉबेरीची चव चाखतात.


या स्ट्रॉबेरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला चव देखील चांगली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीचं हे स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतलं जात अल्याची माहिती शेतकरी जोश कर्णाई यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची