जे आपल्या बापाचा आदर करु शकत नाहीत त्यांना लाज वाटली पाहिजे!

लखनऊ (वृत्तसंस्था): विधानसभेतील अभिभाषणा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्यात आज जोरदार वादावादी झाली. यावेळी योगी यांनी प्रयागराज गोळीबार प्रकरणाबाबत बोलताना मुलायम सिंह यांच्या 'मुले चुका करतात' या विधानाचा उल्लेख केला. तर अखिलेश यांनी चिन्मयानंद यांच्याबद्दल प्रश्न विचारला. यामुळे संतप्त झालेले योगी म्हणाले की, जे आपल्या बापाचा आदर करू शकत नाहीत त्यांना राज्यातील सुरक्षेबाबत बोलताना लाज वाटली पाहिजे.


योगी आदित्यनाथ यांनी भाषणादरम्यान सपावर आरोप करताना म्हटले, हे लोक गुन्हेगारीशिवाय काहीही करू शकत नाहीत. हे लोक गुन्हेगारांना संरक्षण देतात. पण या माफियांना समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करू. प्रयागराज येथील घटनेचा सूत्रधार यूपी बाहेरील आहे. त्यांना तिकीट देऊन आमदार, खासदार केलं गेलं.


योगी यांनी पुढे बोलताना अखिलेश यादव यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी अखिलेश यांना वडिल मुलायम सिंह यादव यांच्या विधानाची आठवण करुन देत योगी म्हणाले, 'मुलं मुलंच असतात, त्यांच्याकडून चुका होतात', अशीच विधाने करणारे लोकशाहीबद्दल बोलतात, याचेच आश्चर्य वाटते.
यावर बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या चिन्मयानंदचा उल्लेख करत अखिलेश यादव म्हणाले की, "हेही सांगा की चिन्मयानंदचे गुरू कोण आहेत? तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे". हे ऐकून सीएम योगी संतापले आणि अखिलेश यांना म्हणाले, "ज्याला स्वतःच्या बापाचा आदर करता येत नाही. त्याला लाज वाटली पाहिजे".


यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या एकत्र येण्यावरही टोमणा मारला. काका शिवपाल यांनी स्वाभिमान जपायला हवा असा खोचक सल्ला त्यांनी शिवपाल यादव यांना दिला.

Comments
Add Comment

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष