स्टंटबाजी करणा-या रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

भाजप निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार!


पुणे : आचार संहितेचा भंग केला म्हणून भाजपच्या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजप निवडणूक आयोगात देखील तक्रार दाखल करणार आहे. यामुळे आता धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना कसब्यात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकर यांनी फक्त आरोप केला नाही तर ते आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतले आहे.


तर धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजप करणार आहे. भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली.


राजेश पांडे म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभव स्पष्ट दिसत आहे. आजचे उपोषण हा त्यांचा स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे स्टंट केले आहेत. कसब्यातील जनतेला हे माहित आहे. धंगेकर यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळाला नाही. धंगेकरांच्या स्टंटबाजीमुळे कसब्यातील मतदार दुखावला आहे."


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काल ५ वाजता प्रचार संपला आहे. तर आज कसबा गणपतीसमोर हा प्रचाराचा भाग होत नाही का, असा माझा सवाल असल्याचे राजेश पांडे म्हणाले.

Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव