अरेरे! बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेल्या शिवसेना पक्षाची उद्धव ठाकरेंनी माती केली

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर राज्यातील वातावरण तापलेले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभारली. मात्र, या पक्षाची उद्धव ठाकरेंनी माती केली, असे नवनीत राणा म्हणाल्या. त्या एका जाहीर कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.


“गर्व माणसाला संपवतो, हे मी फक्त ऐकले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळाले. आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी विचारधारेशी बांधील राहून पक्ष बनवला, वाढवला. त्यांनी रक्ताचं पाणी करत पक्षाला मजबूत केले. एवढे खासदार, आमदार निवडून आले. पण उद्धव ठाकरेंनी पक्षाची माती करण्याचे काम केले", असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.


याआधीही शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी असे म्हटले होते की, "जो रामाचा नाही, हनुमानचा नाही, तो काहीही कामाचा नाही आणि धनुष्यबाणही त्याचा नाही. निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांना भगवान महाशिवने चांगला प्रसाद दिला आहे".

Comments
Add Comment

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख