कल्याणमधील पोलिसांनी शोधले गहाळ झालेले ४४ मोबाईल

  181

कल्याण : कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी सहा महिन्यात गहाळ झालेले साडे पाच लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल शोधले आहेत.


कल्याण रेल्वे स्टेशन, बस स्टँड, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठ आदि वर्दळीच्या ठिकाणी मागील वर्षभरात नागरिकांच्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी अधिकारी, अंमलदाराचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.



हे मोबाईल आज एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, दीपक सरोदे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.


हरवलेला मोबाईल परत मिळेल याबाबत नागरिकांना विश्वास नव्हता. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून आला. मोबाईल शोधून दिल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता