अमृत योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा

कल्याण : अमृत योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष गाठण्यासाठी योजनेला गतिमानता आणणे व योजनेतील अडथळे दूर करणे तसेच प्रत्यक्ष कामाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.


यासाठी महापालिका आयुक्तांनी आज या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोळवली, दावडी, कोळे, काटई ,संदप, सागाव येथील जलकुंभांची व टॅपिंग एकच्या साठी जोडणीसाठी सुरू असलेल्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची ठेकेदार, प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.


तसेच आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल व प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा सूचना दिल्या.


या पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, अमृत योजनेचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)