नाशिक/ठाणे : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. आता हेच प्रकरण त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या विरोधात काल संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात असताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध, पानी का पानी केले.
याच वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांची देखील जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत म्हणाले, आता हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. अशाप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली होती. आता हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…