सोनू सूदच्या नावानं सर्वात मोठी थाळी लाँच

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या एका चाहत्यानं सोनू सूदच्या नावानं देशातील सर्वात मोठी थाळी लॉन्च केली आहे. ही थाळी इतकी मोठी आहे की एकावेळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवण करू शकतात. कदाचित २० जणांचं पोट भरेल पण थाळी काही संपणार नाही इतक्या पदार्थांचा समावेश या थाळीत करण्यात आला आहे.


खुद्द अभिनेता सोनू सूदनं या थाळीसोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सोनू सूद या फोटोंमध्ये एका थाळीच्या बाजूला उभे राहिलेले दिसून येतात. ही थाळी पूर्णपणे पदार्थांनी भरली आहे. देशातील सर्वात मोठी जेवणाची थाळी आता माझ्या नावानं ओळखली जाणार आहे, असं कॅप्शन सोनू सूदनं पोस्टला दिलं आहे. तसंच या थाळीसाठी @gismat_jailmandi चे आभार देखील सोनू सूदनं व्यक्त केले आहेत. गिस्मत अरेबिक मंडी रेस्टॉरंटनं ही थाळी लॉन्च केली आहे. या थाळीचं लॉन्चिंग कोंडापूर ब्रांचमध्ये झालं. यावेळी सोनू सूदसह इन्स्टाग्रामस्टार पद्दु पद्मावती देखील उपस्थित होती.





सोनू सूदच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या थाळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या रेस्टॉरंटच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. थाळीची लांबी ८ फूट असून सुमारे २० लोक एकत्र बसून स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, "हैदराबाद हे स्वादिष्ट आणि अनोख्या पदार्थांचं माहेरघर आहे. खाद्यप्रेमींना एकाच थाळीत जास्तीत जास्त पदार्थांची चव चाखता यावी यासाठी या मोठ्या थाळीची संकल्पना इतक्या नावीन्यपूर्ण पद्धतीने आणण्यात आली आहे की आजपर्यंत कोणीही विचार केला नसेल". आपल्या नावानं लॉन्च होणाऱ्या या थाळीला पाहून तो खूप आनंदी होता.

Comments
Add Comment

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

Vicky Kaushal : विकी कौशलचा मोठा खुलासा! म्हणाला...'वेळ जवळ आलीय', बाळाच्या आगमनाबाबत दिली मोठी हिंट

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार

७ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जेनिफर विंगेट रोमान्स करणार?

मुंबई: सोनी टीव्हीचा लोकप्रिय आणि थ्रिलिंग शो 'बेहद' आता तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची

महाभारतामध्ये कर्णाची भूमिका करणारे पंकज धीर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे

'मनाचे श्लोक' नाही! आता 'तू बोल ना' म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता.

जगप्रसिद्ध 'एमटीव्ही' वाहिनी होणार बंद! नेटकरी भावुक

मुंबई: जगाला चार दशकांहून अधिक काळ संगीत ऐकवणारी 'एमटीव्ही' टीव्ही वाहिनी लवकरच बंद होणार आहे. या बाबत पॅरामाउंट