जीक्वेबेरा (वृत्तसंस्था) : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकून गटात पहिल्या दोन स्थानी असलेला इंग्लंड आणि भारत यांच्यात आज लढत होणार आहे. विजयी हॅटट्रिकसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. विजेता संघ गटात अव्वल स्थानी जाणार असून पुढच्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल. त्यामुळे भारत आणि इंग्लडसाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि इंग्लंड हे संघ तुल्यबळ असून दोन्ही संघांनी विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभवाचे पाणी पाजले आहे. इंग्लंडनेही दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. जेमीमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रीचा घोष, राधा यादव, दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी करत छाप सोडली आहे. भारताचे सलामीवीर मात्र तितके यशस्वी ठरलेले नाहीत.
दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचा सुपडा साफ करत इंग्लंडने गटात दोन विजय साकारले आहेत. त्यांची गोलंदाज सोफी एकलस्टोन लयीत आहे. फलंदाजांनाही सांघिक कामगिरी करण्यात यश आले आहे. त्यामुळे संघाची घडी व्यवस्थित बसली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…