जीक्वेबेरा (वृत्तसंस्था) : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकून गटात पहिल्या दोन स्थानी असलेला इंग्लंड आणि भारत यांच्यात आज लढत होणार आहे. विजयी हॅटट्रिकसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. विजेता संघ गटात अव्वल स्थानी जाणार असून पुढच्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल. त्यामुळे भारत आणि इंग्लडसाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि इंग्लंड हे संघ तुल्यबळ असून दोन्ही संघांनी विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभवाचे पाणी पाजले आहे. इंग्लंडनेही दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. जेमीमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रीचा घोष, राधा यादव, दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी करत छाप सोडली आहे. भारताचे सलामीवीर मात्र तितके यशस्वी ठरलेले नाहीत.
दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचा सुपडा साफ करत इंग्लंडने गटात दोन विजय साकारले आहेत. त्यांची गोलंदाज सोफी एकलस्टोन लयीत आहे. फलंदाजांनाही सांघिक कामगिरी करण्यात यश आले आहे. त्यामुळे संघाची घडी व्यवस्थित बसली आहे.
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…