BCCI : स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

  193

नवी दिल्ली : बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे सुपूर्द केला असून जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


अलीकडेच चेतन शर्मा यांच्यावर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते, अनेक बाबी समोर आल्या होत्या. यादरम्यान चेतन शर्मा यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादापासून ते खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंजेक्शनच्या वापरापर्यंतची अनेक धक्कादायक माहिती उघड केल्याचे समोर आले होते. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उभारले जात होते.





बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्यं केली होती. यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली होती. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.


दरम्यान, बीसीसीआयकडून कारवाई होण्याआधीच चेतन शर्मा यांनी पदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या सचिवांकडे दिलेला राजीनामा मान्य करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल