BCCI : स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

नवी दिल्ली : बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे सुपूर्द केला असून जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


अलीकडेच चेतन शर्मा यांच्यावर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते, अनेक बाबी समोर आल्या होत्या. यादरम्यान चेतन शर्मा यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादापासून ते खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंजेक्शनच्या वापरापर्यंतची अनेक धक्कादायक माहिती उघड केल्याचे समोर आले होते. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उभारले जात होते.





बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्यं केली होती. यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली होती. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.


दरम्यान, बीसीसीआयकडून कारवाई होण्याआधीच चेतन शर्मा यांनी पदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या सचिवांकडे दिलेला राजीनामा मान्य करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.