महाशिवरात्रीचा आरोग्यदायी दृष्टिकोन- वाचा बेल आणि कवठाचे फायदे

  567

मुंबई: उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होईल. आपल्या प्रत्येक सण, उत्सवामधून आरोग्याचे महत्त्व उत्तम पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाशिवरात्री साजरी करताना शिवाला अर्पण केल्या जाणाऱ्या बेलाच्या पानांचे, बेलाच्या झाडाचे महत्त्व मोठे आहे. बेलासोबतच कवठाचा रस पिणे आदी गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याला धार्मिकतेबरोबरच सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्तततेचा आधारही आहे.



आरोग्यदायी दृष्टिकोन


हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या प्रारंभीच महाशिवरात्री येते. या काळात वातावरणातील गारठा कमी होऊन उष्णता वाढू लागल्यामुळे कफदोष निर्माण होऊ शकतो. विशेषत: श्वसनमार्गाच्या तक्रारी वाढतात. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखे आजार वाढू लागतात. भूकही मंदावते. या सर्वांवर बेलफळ आणि कवठ ही फळे उपयुक्त ठरतात. त्यामुळेच त्यांचे पदार्थ आहारात घेणे हा आरोग्यदायी दृष्टिकोन आहे.



फायदेशीर कवठ


कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असून आतड्यातील कृमी व अतिसारावर उपयोगी आहे. तसेच मूळव्याध, पोटातील अल्सर, रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे. गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी कवठाचा गर उपयोगी पडतो. कवठाच्या झाडाची साल हृदय धडधडणे आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी आहे. कवठाचा डिंक मधुमेहावरील उपचारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कवठाच्या बाह्य आवरणापासून सुगंधी तेल, अत्तर व कपड्याचे रंग बनवितात.


कवठाच्या झाडापासून जो डिंक मिळतो त्याला प्रक्रिया उद्योगातही मोठी मागणी आहे. अरेबिक डिंकाला पर्याय म्हणून त्याचा वापर वाढू लागलेला आहे.



बेलाचे त्रिदलरस सेवन


बेल वाहताना सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण शिवाला अर्पण करण्याची धार्मिक भावना असली, तरी आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरस सेवनाला महत्त्व आहे. पोटाचे विकार, पोटफुगी, गॅसेस दूर करण्यासाठी बेलफळाच्या गराचे सरबत उपयुक्त ठरते. महिलांच्या पाळीचे विकार, गर्भाशयाला येणारी सूज, बाळंतपणातील विकारांवरही बेलफळ उपयुक्त आहे. रक्तातील साखर कमी करण्याच्या गुणामुळे बेलाच्या पानांचा ताजा रस मधुमेहावर अत्यंत रामबाण ठरतो.


बेलफळावर प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने आता तयार होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बेलाचा रस, पेय, मुरांबा, बेलाची पोळी, चूर्ण, जेली, वडी आदी उत्पादनांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी