शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड

Share

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.

यांना घेतले ताब्यात

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नंदू पाटील, संतोष सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी, विलास पवार, गजू महाजन, देवा तायडे यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांना धरणगाव पोलीस स्थानकात बोलवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Recent Posts

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

45 minutes ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

1 hour ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

3 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

3 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago