शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.



यांना घेतले ताब्यात


दरम्यान, ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नंदू पाटील, संतोष सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी, विलास पवार, गजू महाजन, देवा तायडे यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांना धरणगाव पोलीस स्थानकात बोलवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Comments
Add Comment

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने