महाशिवरात्रीनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

  104

मुंबई (प्रतिनिधी) : १८ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे जादा बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.


१८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. ही वाढती गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे विशेष सेवा चालवली जाणार आहे. बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बसगाड्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानक) , बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल बस स्थानक) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) या तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालविण्यात येतील, असे बेस्टतर्फे सांगण्यात आले.


प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत बेस्टतर्फे विविध सण, उत्सव या कालावधीत विशेष बस सेवा चालवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीनिमित्त बेस्टतर्फे विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)