महाशिवरात्रीनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

Share

मुंबई (प्रतिनिधी) : १८ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे जादा बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त बोरिवली येथील कान्हेरी लेणी आणि वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. ही वाढती गर्दी लक्षात घेता बेस्टतर्फे विशेष सेवा चालवली जाणार आहे. बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बसगाड्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानक) , बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल बस स्थानक) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) या तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत ६ अतिरिक्त बसेस चालविण्यात येतील, असे बेस्टतर्फे सांगण्यात आले.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत बेस्टतर्फे विविध सण, उत्सव या कालावधीत विशेष बस सेवा चालवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीनिमित्त बेस्टतर्फे विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Recent Posts

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 minute ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

9 minutes ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

56 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago