नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (आयटी) छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० ते ७० अधिकाऱ्यांचा समावेश असणारे आयटी विभागाचे एक पथक मंगळवारी सकाळीच बीबीसीच्या कार्यालयात धडकले. त्यानंतर त्यांनी तातडीने कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन बंद केले. तसेच कार्यालयाबाहेर येण्या-जाण्यावरही बंदी घातली आहे.
प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सध्या बीबीसीच्या कार्यालयातील विविध रेकॉर्ड्सची पडताळणी करत असल्याची माहिती आहे.
केंद्राने बीबीसीच्या डॉक्यूमेंट्री इंडिया ‘द मोदी क्वेश्चन’च्या प्रसारणावर बंदी घातली होती. ही डॉक्यूमेंट्री २००२च्या गुजरात दंगलीवर आधारित होती. केंद्राच्या बंदीनंतरही बीबीसीने ही डॉक्यूमेंट्री काढून टाकली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. पण, सुप्रीम कोर्टाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावत सेन्सॉरशिप लादण्यास स्पष्ट नकार दिला होता.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…