ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये १५ हजार धावपटूंचा सहभाग

ठाणे (प्रतिनिधी) : हिरानंदानी समूहाच्यावतीने ९ वी हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन पार पडली. अभिनेता मिलिंद सोमन, सुपर मॉडेल, चित्रपट निर्माता आणि फिटनेस क्षेत्रातील लोकांसह ठाणे शहर आणि इतर भागातून मोठ्या संख्येने धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेत आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण केली.


ही ठाणे हाफ मॅरेथॉन २१.०९७ किमी, ग्रीन रन १० किमी आणि कौटुंबीक रन ४ किमी या तीन श्रेणीचा समावेश असलेल्या या रनमध्ये जवळपास १५ हजार धावपटू सहभागी झाले होते. हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेणे हा माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव होता, असे अभिनेता मिलिंद सोमण यांनी म्हटले आहे. धावपटू हे समाज आणि देशासाठी एक उत्तम उदाहरण म्हणून काम करतात आणि ‘रन फॉर अर्थ’मोहीम निसर्ग आणि तेथील रहिवाशांच्या कल्याणाला प्राधान्य देत, निसर्गाचा समतोल राखून सर्वोत्तम जगण्याचा अनुभव देण्यासाठी हिरानंदानी समूहाचे कौतुक केले पाहिजे, असेही अभिनेत सोमन म्हणाले.


हिरानंदानी समूहाच्या २०१३ मध्ये ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये ८ हजार धावपटूंची नोंदणी झाली होती. तर यावर्षी १५ हजार हून अधिक धावपटू त्यात सहभागी झाले होते. शाश्वत पर्यावरण हे कंपनीच्या मूलभूत मूल्यांपैकी एक असून हिरानंदानी पर्यावरण रक्षण व समतोल साधण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने