बायकोचा मृतदेह घेऊन तो कित्येक किलोमीटर चालत राहिला....

ओडीशा: ओडीशात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. माणूसकीची परिक्षा पाहणाऱ्या या घटनेने व्यवस्थेला हादरे दिले आहेत. ओडिशातील एक व्यक्ती पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल कित्येक किलोमीटर अंतर पायी चालला. त्यावेळी काय घडलं हे वाचून तुमचं काळीज पिळवटून जाईल.


ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील सुराडा गावातील समुलु आणि त्याची पत्नी गुरु यांची ही गोष्ट. त्याच्याकडे तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी पैसे नव्हते आणि तो हतबल माणूस मृतदेह खांद्यावर घेऊन चालायला लागला. त्याला तब्बल १२५ किलोमीटरचे अंतर कापायचे होते. त्यातील कित्येक किलोमीटर अंतर तो पायी चालला.


सॅमुलू आपल्या आजारी पत्नीला उपचारासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला घेऊन आला होता. तिच्या उपचाराचा खर्च उचलता न आल्याने हा आदिवासी माणूस तिला ऑटोरिक्षाने घरी परत घेऊन जात होता. त्याला ऑटोरिक्षाने सालूर गाठायचे होते आणि तेथून दुसऱ्या वाहनाने गाव गाठायचे होते. त्याला ऑटोरिक्षा मिळाली. मात्र, वाटेतच तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिने प्राण सोडला. यावेळी रिक्षाचालकाने मध्येच वाहन थांबवून त्या व्यक्तीला मृतदेहासह खाली उतरण्यास सांगितले. सॅमुलूने किमान त्याला सालुरू येथे सोडण्याची विनंती करूनही, ऑटो-रिक्षा चालकाने नकार दिला.


पुढे जाण्यासाठी हातात पैसे नसल्यामुळे तो मृतदेह खांद्यावर घेऊन गावाकडे निघाला. तो राष्ट्रीय महामार्गावरून चालत होता. वाटेत येणारे जाणारे फक्त त्याच्याकडे बघत होते पण त्याला मदत करायला कोणी थांबले नाही. शेवटी एका सुहृदयी वाटसरुने पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली.


जवळील पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी तिरुपती राव आणि उपनिरीक्षक किरण कुमार यांनी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याशी बोलून सर्व तपशील गोळा केला, त्याला अन्न आणि पाणी दिले आणि मृतदेह त्याच्या गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे