बायकोचा मृतदेह घेऊन तो कित्येक किलोमीटर चालत राहिला....

ओडीशा: ओडीशात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. माणूसकीची परिक्षा पाहणाऱ्या या घटनेने व्यवस्थेला हादरे दिले आहेत. ओडिशातील एक व्यक्ती पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल कित्येक किलोमीटर अंतर पायी चालला. त्यावेळी काय घडलं हे वाचून तुमचं काळीज पिळवटून जाईल.


ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील सुराडा गावातील समुलु आणि त्याची पत्नी गुरु यांची ही गोष्ट. त्याच्याकडे तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी पैसे नव्हते आणि तो हतबल माणूस मृतदेह खांद्यावर घेऊन चालायला लागला. त्याला तब्बल १२५ किलोमीटरचे अंतर कापायचे होते. त्यातील कित्येक किलोमीटर अंतर तो पायी चालला.


सॅमुलू आपल्या आजारी पत्नीला उपचारासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला घेऊन आला होता. तिच्या उपचाराचा खर्च उचलता न आल्याने हा आदिवासी माणूस तिला ऑटोरिक्षाने घरी परत घेऊन जात होता. त्याला ऑटोरिक्षाने सालूर गाठायचे होते आणि तेथून दुसऱ्या वाहनाने गाव गाठायचे होते. त्याला ऑटोरिक्षा मिळाली. मात्र, वाटेतच तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिने प्राण सोडला. यावेळी रिक्षाचालकाने मध्येच वाहन थांबवून त्या व्यक्तीला मृतदेहासह खाली उतरण्यास सांगितले. सॅमुलूने किमान त्याला सालुरू येथे सोडण्याची विनंती करूनही, ऑटो-रिक्षा चालकाने नकार दिला.


पुढे जाण्यासाठी हातात पैसे नसल्यामुळे तो मृतदेह खांद्यावर घेऊन गावाकडे निघाला. तो राष्ट्रीय महामार्गावरून चालत होता. वाटेत येणारे जाणारे फक्त त्याच्याकडे बघत होते पण त्याला मदत करायला कोणी थांबले नाही. शेवटी एका सुहृदयी वाटसरुने पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली.


जवळील पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी तिरुपती राव आणि उपनिरीक्षक किरण कुमार यांनी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याशी बोलून सर्व तपशील गोळा केला, त्याला अन्न आणि पाणी दिले आणि मृतदेह त्याच्या गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

Comments
Add Comment

Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरु उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे