मुंबईकरांसाठी आता जादा पाणी मिळणार...

मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून सध्या असलेले पाण्याचे स्तोत्र कमी पडत आहेत. मुंबईकरांची वाढती पाण्याची तहान भागवण्यासाठी आता महापालिकेच्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच विहार तलावातील वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.


मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी सद्य स्थितीत मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मात्र मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता भविष्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. वेळेवर पाऊस न आल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी कमी होत जातो आणि मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागते. २०२२ मध्ये ही अशीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली होती. त्यामुळे मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका नव्या उपाययोजना करीत आहे. या प्रकल्पासाठी विहार सरोवर येथे पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून भांडूप जल शुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाईल. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून खर्चही वाढणार आहे. यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीनंतर किती पाण्यावर प्रक्रिया केली जाणार? हे निश्चित होणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले .

Comments
Add Comment

Property Tax थकीत बिलाच्या रकमेवरील दंड २ टक्क्यांऐवजी १ टक्का ?

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले संकेत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांना महापालिकेच्यावतीने

BMC Budget : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प रेकॉर्डब्रेक चर्चेनंतर मंजूर

एकूण ९४ तास झाली चर्चा, तब्बल १८८ नगरसेवकांनी घेतला सहभाग सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपण केल्यामुळे

DJ company : डिजे वाजवणाऱ्या कंपनीला रस्त्यावरील रेलिंगचे कंत्राट

कुणाच्या दबावाखाली महापालिकेने दिले शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी उबाठाची केली बोलतीच बंद मुंबई (विशेष

NEET UG परीक्षेसाठी मेगाब्लॉकच्या नियोजनात बदल, जाणून घ्या कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक ?

मुंबई : नीट युजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकच्या

Night Block : कल्याण-बदलापूर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

कल्याण : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने कल्याण-बदलापूर दरम्यान १ ते ३ मेदरम्यान दोन रात्री विशेष पॉवर ब्लॉक जाहीर

Megablock : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेजर ब्लॉक

मुंबई : मुंबईतील मेट्रो ६ च्या स्टील गर्डर लाँचिंगच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २ आणि ३ मे च्या मध्यरात्री १०