जबलपूर (वृत्तसंस्था) : चढाईपटू हरजित, यशिका पुजारी, मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या फायनलचे तिकीट मिळवून दिले. युवा कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर १२ गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ४४-३१ अशा फरकाने उपांत्य फेरीत एकतर्फी विजय संपादन केला.
या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करता आला. महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनलमध्ये समोरासमोर येत आहेत. गत सत्रामध्ये हरियाणाच्या संघाने फायनलमध्ये महाराष्ट्राचा पराभव केला होता.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…