‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

Share

मुंबई(वार्ताहर) : ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे सर्वसा संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अल्पशा आजारामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल, ठाणे येथे वयाच्या ७०व्या वर्षी दुःखद निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर माजीवाडा, ठाणे येथील बाळकुम स्मशानभूमीत सायंकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी; दोन मुले कुणाल आणि कृपाल, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते हा ‘भारतरत्न’ महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याच्या निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले.

वरळीमध्ये ते राहत असतांना सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी भारतीय दलित पँथरच्या चळवळीला पाठिंबा दिला. ते ‘नवाकाळ’मध्ये पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे २००३ पासून स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. राज्यातील अनेक बौद्ध, बहुजन, मागासवर्गीय यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला चकराप देऊन न्याय मिळवून देण्याचे महानकार्य त्यांच्या धारधार लेखणीने दैनिक सम्राटच्या माध्यमातून केले़ त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे़

Recent Posts

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

14 mins ago

Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…

25 mins ago

Britain government : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…

56 mins ago

Cycle Wari : पंढरीच्या वारीसाठी नाशिककरांची सायकलस्वारी!

एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…

1 hour ago

Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची…

2 hours ago

Mumbai News : बर्फीवाला उड्डाणपुलासह गोखले पूल मुंबईकरांच्या प्रवासासाठी पुन्हा सज्ज!

मात्र 'या' वाहनांच्या वाहतुकीवर बंदी मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पुलाची…

2 hours ago