‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

  474

मुंबई(वार्ताहर) : ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे सर्वसा संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अल्पशा आजारामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल, ठाणे येथे वयाच्या ७०व्या वर्षी दुःखद निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर माजीवाडा, ठाणे येथील बाळकुम स्मशानभूमीत सायंकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी; दोन मुले कुणाल आणि कृपाल, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते हा ‘भारतरत्न’ महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याच्या निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले.


वरळीमध्ये ते राहत असतांना सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी भारतीय दलित पँथरच्या चळवळीला पाठिंबा दिला. ते ‘नवाकाळ’मध्ये पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे २००३ पासून स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. राज्यातील अनेक बौद्ध, बहुजन, मागासवर्गीय यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला चकराप देऊन न्याय मिळवून देण्याचे महानकार्य त्यांच्या धारधार लेखणीने दैनिक सम्राटच्या माध्यमातून केले़ त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे़

Comments
Add Comment

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)