‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

मुंबई(वार्ताहर) : ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे सर्वसा संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अल्पशा आजारामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल, ठाणे येथे वयाच्या ७०व्या वर्षी दुःखद निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर माजीवाडा, ठाणे येथील बाळकुम स्मशानभूमीत सायंकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी; दोन मुले कुणाल आणि कृपाल, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते हा ‘भारतरत्न’ महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याच्या निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले.


वरळीमध्ये ते राहत असतांना सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी भारतीय दलित पँथरच्या चळवळीला पाठिंबा दिला. ते ‘नवाकाळ’मध्ये पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे २००३ पासून स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. राज्यातील अनेक बौद्ध, बहुजन, मागासवर्गीय यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला चकराप देऊन न्याय मिळवून देण्याचे महानकार्य त्यांच्या धारधार लेखणीने दैनिक सम्राटच्या माध्यमातून केले़ त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे़

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती