होळीसाठी कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस सोडणार!

०३ ते १२ मार्च दरम्यान धावणार एसटीच्या जादा गाड्या


मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त यावर्षी २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ०३ मार्च ते १२ मार्च दरम्यान कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. यावेळी, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.


गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.



एसटी महामंडळाचे ऍप डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा...


Comments
Add Comment

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम

पुण्यात पेट्रोल महागले, इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा