खारघरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? अधिकारी म्हणाले...

पनवेल : खारघर आणि परिसरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. यातून फुटपाथही सुटलेले नाहीत. काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी कार्यालये थाटली आहेत. मात्र पनवेल महापालिकेचा अतिक्रमण विभाग त्यावर कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.


खारघर नोड हा मोठा परिसर आहे. तेथे अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. पनवेल पालिकेचा अतिक्रमण विभाग तात्पूरती कारवाई करतो. त्यातही बड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप येथील नागरिक करतात. सेक्टर १६ येथे फुटपाथवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले आहे. युफोरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेनेही फुटपाथवर कार्यालय थाटले आहे. सेक्टर ३४ मध्ये पेठ गावाजवळ निळकंठ ग्रुपचे कार्यालयही फुटपाथवर आहे. त्यामुळे फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी आहे की अतिक्रमण करणारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.


फुटपाथवर ही अतिक्रमणे होईपर्यंत पालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याने पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खारघर येथील अतिक्रमण विभागाचे जितेंद्र मढवी यांना याबाबत विचारले असता त्यांनी पाच जणांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यात त्यांनी स्वतःहून ती हटवली नाहीत तर पालिका ती हटवेल, असे सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai's Tourist in Uttarakhand : धक्कादायक! उत्तराखंडमध्ये मुंबईच्या पर्यटकांवर थरारक हल्ला, पोलिसांसमोरच दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न

मुंबई : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईतील पर्यटकांना अत्यंत धक्कादायक

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री