मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होणार...

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) चे पहिले दोन टप्पे डिसेंबर २०२३ पर्यंत १ हजार ०६० कोटी खर्चून पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. रस्ता तयार झाल्यावर, मुलुंड ते गोरेगाव दरम्यानचा प्रवासाचा वेळ २० मिनिटांपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे.


सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यांसारख्या इतर प्रमुख मार्गांवर गर्दी कमी करण्यासाठी गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) ते मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा लिंक रोड महत्त्वाचा ठरेल. हा प्रकल्प चार टप्प्यात विभागला गेला असून त्याची किंमत सुमारे ८ हजार कोटी आहे. संपूर्ण प्रकल्प २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
फेज-१ अंतर्गत, महानगपालिकेने नाहूर रोड ओव्हर ब्रिजचे ७० टक्के काम पूर्ण केले. हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मुलुंड पश्चिम आणि गोरेगाव पूर्व येथील जीएमएलआर रुंदीकरणाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. “दुसऱ्या टप्प्याचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल”, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. बीएमसीने चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) यासाठी ४४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


नागरी संस्थेने कामाचा तिसरा टप्पा नुकताच सुरू केला आहे ज्यात गुरु गोविंद सिंग रोड आणि GMLR जंक्शन येथे उन्नत रोटरी बांधणे, गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथे उड्डाणपूल आणि मुलुंड पश्चिम येथील हेडगेवार जंक्शन येथे उड्डाणपूल यांचा समावेश आहे. जानेवारी २०२५ पर्यंत प्रकल्पाचे ७ टक्के काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.



बोगदे २०२८ पर्यंत पूर्ण होतील


बॉक्स बोगदा आणि जुळ्या बोगद्यांचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. चौथ्या टप्प्यात मुलुंड पूर्व येथे ऐरोली जंक्शन येथे उड्डाणपूल आणि गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ओलांडून एक अंडरपास बांधणे यांचा समावेश आहे. बोगद्याचे काम सुरू झाल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. कंत्राट दिल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित