खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट, तीन पुलांची कामे...

खेड(वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या जोड पुलाचे काम पूर्ण झाले असून, मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाण पूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभीळ येथील उड्डाणपुलाची कामे पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यांत महामार्गावरील खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.


खेड तालुक्याच्या हद्दीतील जगबुडी नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस मध्यरात्री नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात ३७ जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती.
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे, त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे कामही पूर्ण झाले असून आता दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचे काम सुरू आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाले की या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे बांधकाम विभागाचे अभियंता माडकर यांनी सांगितले. भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्याशिवाय दाभीळ येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, मार्च-एप्रिल दरम्यान पूर्ण होऊन या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे़.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी