दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग, सर्व कागदपत्रे जळाली

कर्जत: कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत बँकेतील सर्व दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.


या बँकेला पहाटे लागलेली आग तिथून जाणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याच्या निदर्शनास आली. तात्काळ त्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ यांना कळविले. ग्रामस्थ व कर्जत पोलीस यांच्या मदतीने पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाच्या कर्जतच्या टीमला पाचारण केले.


आज बँक बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अन् मोठा अनर्थ टळला . यानंतर ही आग विझविण्याचे शर्थीचे पर्यंत सुरू करण्यात आले. ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत बँकेच्या सर्व कागदपत्रांसह इतर सर्व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते.


यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची संपुर्ण टीम उपस्थित होती. सदरील लागलेल्या आगीत बँकेचा डेटा ३ ठिकाणी सुरक्षित असून बँकेचा विमा असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बँकेचे सर्व व्यवहार येत्या चार दिवसात सुरळीत होतील. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बँकेचे संचालक राजेंद्र हजारे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :