दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग, सर्व कागदपत्रे जळाली

कर्जत: कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत बँकेतील सर्व दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.


या बँकेला पहाटे लागलेली आग तिथून जाणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याच्या निदर्शनास आली. तात्काळ त्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ यांना कळविले. ग्रामस्थ व कर्जत पोलीस यांच्या मदतीने पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाच्या कर्जतच्या टीमला पाचारण केले.


आज बँक बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अन् मोठा अनर्थ टळला . यानंतर ही आग विझविण्याचे शर्थीचे पर्यंत सुरू करण्यात आले. ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत बँकेच्या सर्व कागदपत्रांसह इतर सर्व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते.


यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची संपुर्ण टीम उपस्थित होती. सदरील लागलेल्या आगीत बँकेचा डेटा ३ ठिकाणी सुरक्षित असून बँकेचा विमा असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बँकेचे सर्व व्यवहार येत्या चार दिवसात सुरळीत होतील. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बँकेचे संचालक राजेंद्र हजारे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह