आशिया चषकाच्या ठिकाणाबाबत संभ्रम कायम…

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे अधिकृत यजमानपद असले, तरी सुरक्षेमुळे ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते. शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली. आशिया चषक कुठे होणार? याबाबत मार्चमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत ठरले. परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठीही बैठकीत उपस्थित होते.

या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा अधिकृत यजमान आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करू शकत नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते. त्यानंतर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयशी वाद घातला. भारत आशिया चषक स्पर्धेत खेळायला आला नाही, तर पाकिस्तानचा संघही यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती.
आशिया चषक पाकिस्तानात न झाल्यास तो यूएईला हलवला जाऊ शकतो. शेवटचा आशिया चषकही तेथेच झाला होता, ज्याचे यजमान श्रीलंकेत होते. श्रीलंकेतील राजकीय गोंधळामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.
२०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे, आयपीएल सीझन देखील यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. अशा स्थितीत आशिया चषकासाठीही यूएई हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांची शनिवारी बहरीनमध्ये आशिया कप २०२३ संदर्भात पहिली औपचारिक बैठक झाली. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारताने नकार दिल्यानंतर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर आशियाई क्रिकेट परिषद मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवेल. या बैठकीत अद्याप कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. मात्र भारत पाकिस्तानमध्ये न जाण्यावर ठाम आहे.

आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानमध्ये आहे. पण मार्चमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत आशिया कप स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी आशिया कप युएईमध्ये होऊ शकतो. श्रीलंका हाही पर्याय आहे, पण युएईचा दावा मजबूत मानला जात आहे.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

48 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

57 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

1 hour ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago