रस्ता गेला चोरीला, सरपंच बसणार उपोषणाला

इगतपुरी (प्रतिनिधी ): इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तक्रारीची प्रत ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आलेली आहे.


हा चोरी झालेला रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करणार असल्याचे सरपंच सौ. संगीता धोंगडे यांनी सांगितले. शासकीय निधीतून होणारा खर्च जनतेसाठी खर्च व्हावा, कोणाच्याही खिशात हा निधी जाऊ देणार नाही. ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, संबंधित व्यक्तींकडून वसुली व्हावी, रस्ता शोधून द्यावा अशी मागणी भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे.


दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की कुऱ्हेगाव येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन काशाबाई मंदिर ते हनुमान मंदिर हा १० लाखाचा रस्ता कॉंक्रिटीकरण काम मंजूर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ह्या कामाची गावकऱ्यांनी जवळजवळ सहा महिने वाट पाहिली. त्यानंतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता रस्ता गावातून गायब झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. म्हणून कुऱ्हेगाव येथे खमंग चर्चा रंगली असून हा रस्ता नेमका गेला कुठे याची चर्चा आहे. हा रस्ता शोधून द्यावा अशी मागणी सरपंच धोंगडे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर