बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

महिला आगरव्यवस्थापकांच्या स्थानकातच महिला उपेक्षित



  • रविंद्र थोरात


बदलापूर : एकीकडे सरकार विविध योजनांसाठी करोडो रुपये खर्च करत असताना राज्यातल्या एसटी महामंडळाच्या आगारात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. बदलापुर बस आगारात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याने येथे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. बदलापुरात शेकडो महिला कामासाठी बाहेर पडतात पण बदलापूर स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बस स्थानकात बस वाहक व चालक महिला, शालेय विद्यार्थिनी, दिव्यांग महिला, ज्येष्ठ महिला, महिला पोलीस, समाजसेविका, मजूरी करणाऱ्या स्त्रियांसह इतर महिला प्रवासी बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करत आहेत. अनेक महिलांना बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करावा लागतो.



'स्वच्छतागृहाच प्रस्ताव विचाराधीन'


आमचे बांधकाम खाते वेगळे आहे. बदलापूर बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाच प्रस्ताव दिलेला असून विचाराधीन असल्याचे आगरव्यवस्थापक मानसी शेळके यांनी प्रहारला सांगितले.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार