बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

महिला आगरव्यवस्थापकांच्या स्थानकातच महिला उपेक्षित



  • रविंद्र थोरात


बदलापूर : एकीकडे सरकार विविध योजनांसाठी करोडो रुपये खर्च करत असताना राज्यातल्या एसटी महामंडळाच्या आगारात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. बदलापुर बस आगारात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याने येथे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. बदलापुरात शेकडो महिला कामासाठी बाहेर पडतात पण बदलापूर स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बस स्थानकात बस वाहक व चालक महिला, शालेय विद्यार्थिनी, दिव्यांग महिला, ज्येष्ठ महिला, महिला पोलीस, समाजसेविका, मजूरी करणाऱ्या स्त्रियांसह इतर महिला प्रवासी बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करत आहेत. अनेक महिलांना बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करावा लागतो.



'स्वच्छतागृहाच प्रस्ताव विचाराधीन'


आमचे बांधकाम खाते वेगळे आहे. बदलापूर बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाच प्रस्ताव दिलेला असून विचाराधीन असल्याचे आगरव्यवस्थापक मानसी शेळके यांनी प्रहारला सांगितले.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले