बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

महिला आगरव्यवस्थापकांच्या स्थानकातच महिला उपेक्षित



  • रविंद्र थोरात


बदलापूर : एकीकडे सरकार विविध योजनांसाठी करोडो रुपये खर्च करत असताना राज्यातल्या एसटी महामंडळाच्या आगारात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. बदलापुर बस आगारात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याने येथे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. बदलापुरात शेकडो महिला कामासाठी बाहेर पडतात पण बदलापूर स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बस स्थानकात बस वाहक व चालक महिला, शालेय विद्यार्थिनी, दिव्यांग महिला, ज्येष्ठ महिला, महिला पोलीस, समाजसेविका, मजूरी करणाऱ्या स्त्रियांसह इतर महिला प्रवासी बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करत आहेत. अनेक महिलांना बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करावा लागतो.



'स्वच्छतागृहाच प्रस्ताव विचाराधीन'


आमचे बांधकाम खाते वेगळे आहे. बदलापूर बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाच प्रस्ताव दिलेला असून विचाराधीन असल्याचे आगरव्यवस्थापक मानसी शेळके यांनी प्रहारला सांगितले.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून