बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

  195

महिला आगरव्यवस्थापकांच्या स्थानकातच महिला उपेक्षित



  • रविंद्र थोरात


बदलापूर : एकीकडे सरकार विविध योजनांसाठी करोडो रुपये खर्च करत असताना राज्यातल्या एसटी महामंडळाच्या आगारात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. बदलापुर बस आगारात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याने येथे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. बदलापुरात शेकडो महिला कामासाठी बाहेर पडतात पण बदलापूर स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बस स्थानकात बस वाहक व चालक महिला, शालेय विद्यार्थिनी, दिव्यांग महिला, ज्येष्ठ महिला, महिला पोलीस, समाजसेविका, मजूरी करणाऱ्या स्त्रियांसह इतर महिला प्रवासी बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करत आहेत. अनेक महिलांना बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करावा लागतो.



'स्वच्छतागृहाच प्रस्ताव विचाराधीन'


आमचे बांधकाम खाते वेगळे आहे. बदलापूर बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाच प्रस्ताव दिलेला असून विचाराधीन असल्याचे आगरव्यवस्थापक मानसी शेळके यांनी प्रहारला सांगितले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या

आता गृहनिर्माण प्रकल्पाच्या महारेरा नोंदणी प्रमाणपत्रावर इत्यंभुत माहिती

 समग्र तपशील प्रमाणपत्राच्या परिशिष्टात मुंबई : येथून पुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि

BMC: महापालिकेच्या वतीने सुमारे २० हजार कोटींचा वातावरणीय अर्थसंकल्प

यंदा बेस्टचा समावेश, भविष्यात इतर प्राधिकरणे आणि मंडळांचाही होणार विचार मुंबई (खास प्रतिनिधी) : पर्यावरण

बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे