बेस्टच्या तुटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबई : कोणतीही भाडेवाढ नसलेला आणि तोट्यात असलेला साल २०२३ - २४ च्या बेस्ट अर्थसंकल्पाला आज अखेर मंजुरी मिळाली. दोन हजार एक कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी आज मंजुरी दिली .


प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. तसेच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. मात्र डिझेल, सीएनजीचे वाढते दर यामुळे बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला तोटा सहन करावा लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत प्रवाशांसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे बेस्ट उपक्रमाच्या महसुलात वाढ झाली आहे. भविष्यात बेस्ट उपक्रमाला होणारी तुट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न असल्याचे बेस्ट महाव्यवस्थापकांनी सांगितले .



यंदाच्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तुट कमी


बेस्ट उपक्रमाच्या सन २०२३ - २४ च्या २ हजार १ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचे प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सादर केला होता. सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात २ हजार २३६. ४८ कोटींची तुट होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तुट कमी झाली असून बस मार्गांत व बस फेऱ्यांमध्ये केलेली वाढीमुळे महसुलातही वाढ झालेल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.



मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पांकडे सर्वांचे लक्ष


दरम्यान, नवीन वातानुकूलित बसेस खरेदीसाठी ७७४ कोटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासह अन्य कामांसाठी २ हजार कोटी असे २,७७४ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने पालिकेला केली आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या पदरी काय पडणार याकडे बेस्ट उपक्रमाचे व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत