अंबरनाथ : शासकीय जमिनीवरील शर्तभंग नियमानुकूल कालावधी वाढवून देण्यासाठी अंबरनाथ येथील रहिवाशांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
अंबरनाथ मधील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था व डी. डी. स्कीम–१५ मधिल सदनिका व भूखंड धारकांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करणेबाबत घेतलेल्या धोरणात्मक शासन निर्णयाचा कालावधी वाढवून देण्यात यावा तसेच भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकिय जमिनींचा धारणाधिकार रुपांतरीत (भोगवटादार वर्ग -१) करण्यास घातलेली बंदी उठविण्यात यावी याकरीता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात भेट घेत लेखी मागणी केली.
यावर विखे पाटील यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…