प्रमोशन मध्ये रिझर्वेशन लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

  162

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनडीएच्या बैठकीत मागणी


नवी दिल्ली : अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार दर ५ वर्षांनी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.


आगामी २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत एनडीएला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.


यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या विषयाकडे आठवले यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष वेधले.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा कायदा करणे आवश्यक होते. मात्र अनेक राज्यांत तसा कायदा झालेला नाही. त्यामुळे संविधानाच्या तत्वानुसार केंद्र सरकारने लवकरच दलित आदिवासी मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती मधील आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण