प्रमोशन मध्ये रिझर्वेशन लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनडीएच्या बैठकीत मागणी


नवी दिल्ली : अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार दर ५ वर्षांनी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.


आगामी २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत एनडीएला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.


यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या विषयाकडे आठवले यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष वेधले.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा कायदा करणे आवश्यक होते. मात्र अनेक राज्यांत तसा कायदा झालेला नाही. त्यामुळे संविधानाच्या तत्वानुसार केंद्र सरकारने लवकरच दलित आदिवासी मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती मधील आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात