प्रमोशन मध्ये रिझर्वेशन लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनडीएच्या बैठकीत मागणी


नवी दिल्ली : अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार दर ५ वर्षांनी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.


आगामी २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत एनडीएला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.


यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या विषयाकडे आठवले यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष वेधले.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा कायदा करणे आवश्यक होते. मात्र अनेक राज्यांत तसा कायदा झालेला नाही. त्यामुळे संविधानाच्या तत्वानुसार केंद्र सरकारने लवकरच दलित आदिवासी मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती मधील आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे