नऊगांव कुणबी समाज (सर्वे) विभाग अध्यक्षपदी निलेश खामकर यांची निवड

  160

मुरूड : मुरुड तालुक्यातील निलेश काशिनाथ खामकर यांची नऊगांव कुणबी समाज (सर्वे) विभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


नऊगांव कुणबी समाज (सर्वे विभाग) यांच्या नऊगांव कुणबी समाजाच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीच्या सभेत निलेश खामकर यांची सर्वे विभाग अध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. हरिश्चंद कांगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समाजाच्या विविध अडिअडचणी, समस्यांवर चर्चा, विचार-विनिमय करण्यात आला.


यावेळी समाजाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नऊगांव कुणबी समाज (सर्वे) विभाग अध्यक्षपदी निलेश खामकर, उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र कांगणे, सचिव शशिकांत बांद्रे, सहसचिव उदय महाडीक, दामोदर बांद्रे, खजिनदार संतोष पोटले, सहखजिनदार दिपक नाईक, सल्लागार म्हणून गजानन भोईर, नरेश धार्वे, सुशील खोपकर, मिलिंद महाडीक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या