मुंबई (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर – गावसकर करंडकसाठी ४ कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळविले जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट पुढे आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त ठरला असून भारतीय संघाचा एक भाग असू शकतो.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह हा दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघात सहभागी होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहेत. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.
जुलै २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला होता. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३० कसोटी सामने, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १२८, एकदिवसीय सामन्यात १२१ आणि टी २० मध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…