शिक्कामोर्तब झाले, जसप्रीत बुमराह खेळणार...

  131

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर - गावसकर करंडकसाठी ४ कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळविले जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट पुढे आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त ठरला असून भारतीय संघाचा एक भाग असू शकतो.


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह हा दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघात सहभागी होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहेत. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.


जुलै २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला होता. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३० कसोटी सामने, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १२८, एकदिवसीय सामन्यात १२१ आणि टी २० मध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल