'ही' अट मान्य केल्यास झोमॅटोवर फ्री डिलिव्हरी

  209

ऑनलाईन जेवण मागवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता झोमॅटोने फ्री डिलिव्हरी सेवा सुरु केली आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे.


झोमॅटो या फुड डिलिव्हरी अ‍ॅपने मार्च २०२२ मध्ये १० मिनिट फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. ही सेवा झोमॅटो इन्स्टंट म्हणून ओळखली जात होती. दिल्ली एनसीआर आणि बंगळुरू येथे या सेवेला सुरुवातही झाली होती. मात्र, कंपनीला ही सेवा देण्यात अनेक अडचणी येत होत्या.


१० मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीला कमी ऑर्डर मिळत होत्या. त्यामुळे कंपनीने जाहीर केले की, ही डिलिव्हरी सेवा थांबवण्यात येणार नाही. परंतु या सेवेचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला तीन महिन्यांसाठी १४९ रुपये मोजावे लागतील. दरम्यान या सेवेद्वारे फुड ऑर्डर करणाऱ्यांना १० किमीच्या रेडियसमध्येच अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी मिळेल.



'ही' गोष्ट करावी लागणार...


यासाठी तुम्हाला झोमॅटो गोल्डची मेंबरशीप घ्यावी लागेल. यामध्ये यूझर्सला मोफत डिलिव्हरी (१० किमीच्या रेडियसमध्येच), विनाविलंब डिलिव्हरीची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी अ‍ॅक्सेस आणि इतर अनेक ऑफर्स देखील देण्यात येतील.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे