मुंबई : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, अभिषेक, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव राज्यात सर्वत्र उत्साहात संपन्न होत आहे.
विविध गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, महाआरती, महाप्रसादाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे.
सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाविकांची पहाटेपासून रिघ लागली होती. हातात फुलांच्या माळा, आरतीचे ताट घेऊन महिला भाविक तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या दिसत होत्या.
सिद्धिविनायकाचे दर्शन घेणा-या भाविकांची गर्दी दादर रेल्वे स्थानकापासून दिसून येत होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सजावट करण्यात येते. यंदा माघी गणेशजयंती सलग लागून आल्याने मंदिरावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगी ध्वज रंगसंगतीची सजावट केली आहे. मंदिराच्या मुकुटस्थानी केशरी रंग त्यानंतर अशोक चक्र आणि खालच्या बाजूला तिरंग्याचे तीन पट्टे व अशोकचक्र अशी आकर्षक सजावट केलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
राज्यात सर्वत्र बुधवारी पहाटे चार वाजल्यापासूनच परिसरातील ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी करतात. भक्तिगीते आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जाते.
दादर येथील श्री उद्यानगणेश मंदिर, अंधेरी मालापा डोंगरी येथील गणेश मंदिर, कांदिवली येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आदी मंदिरांबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक मंदिराच्या वतीने मंडप, महिला-पुरुष रांगांची सोय करण्यात आली होती. अशातच हार, दुर्वा, फुले अन्य पूजेचे साहित्य विक्री करणारे स्टॉलही मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी लाडू, पेढा, खोब-याची वडी या प्रसादाचे वाटप चालू होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…