वीजचोरी करणाऱ्या जीन्स वॉशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण (वार्ताहर) : उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिटवाळ्यातील गुरवली पाडा स्थित या कंपनीने मीटर बायपास करून तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. जागामालक व कंपनीच्या चालकाविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


वीज ग्राहक विकास बबन दळवी व वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पथकाने १७ जानेवारीला गुरवली पाड्यातील काळू नदी ब्रिजजवळील क्रमांक ५३६/१३ गाळाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. सखोल तपासणी केली असता मीटरकडे येणारी केबल छतावर कट करून टॅपिंग केल्याचे आढळले. मीटर टाळून टॅपिंग केलेल्या केबलच्या साहाय्याने वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. मात्र विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे पुढील तपास करीत आहेत.


या कारवाईत सहाय्यक अभियंते धनंजय पाटील, अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंता अपर्णा शेलार-सकपाळ, तंत्रज्ञ विजय बावणे, बाह्यस्त्रोत कर्मचारी जयेश वावरे यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये