मराठवाड्यात आज पुन्हा पावसाची शक्यता

  67

अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे


औरंगाबाद : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे रब्बीच्या पीकांना मोठा फटका बसला आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नसून, २५ जानेवारी रोजी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान देखील तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.


गव्हाच्या पीकांना सर्वाधिक फटका बसला असून, औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडली आहेत. प्लॉटचे प्लॉट आडवे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. त्यातच आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल पण त्यासाठी संवाद गरजेचा - मुख्यमंत्री

पुणे: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल, पण त्यासाठी संवादाची गरज आहे. आंदोलनातून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी