‘त्या’ कंपनीतील कामगार कामावर रुजू

  186

बोईसर(वार्ताहर) : महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी चाललेल्या कंत्राटी कामगारांचा संप अखेर किसान मोल्डिंग कंपनी मालक, कामगार आयुक्त, पोलिसांच्या मध्यस्थीने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करीत मंगळवार, २५ जानेवारी रोजी संपला, यानंतर सर्व कामगार कामावर रुजू झाले. तसेच माथाडी आणि जनरल कामगार संघटनेला कामगारांनी लेखी पत्र देत रामराम ठोकला आहे, त्यामुळे कंपनीत आंदोलन करणारी युनियन बरखास्त झाली आहे.


बोईसर पूर्वेकडील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील किसान मोल्डिंग्ज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी २१ डिसेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ पर्यंत कामगार नेते सुशील चुरी यांच्या चिथावणीने कंपनीमध्ये संप केला होता. संपामुळे सुरळीत असलेल्या उत्पादन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. कंपनीमध्ये काम करणारे कंत्राटी कामगारांमध्ये स्थानिकांची संख्या मोठी आहे, महिलांचाही समावेश आहे़ कामगार अनेक वर्षांपासून कंपनीत आनंदाने कार्यरत आहेत. कामगार नेते सुशील चुरी यांनी दिशाभूल केल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. आंदोलनामुळे कंपनीचे नुकसान झाले असून, कामगारांना वेतन न मिळाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.


कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे, पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे आणि किसान मोल्डिंग्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव अग्रवाल यांच्या उपस्थितीत कंत्राटी कामगारांसोबत बैठक पार पडली. हे कामबंद आंदोलन सामंजस्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगत कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले.


कामगार नेते चुरी यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून कामगारांने नुकसान झाले. कामगारांना बेकायदेशीर संप करण्यासाठी प्रवृत्त केल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आल्यानंतर मंगळवार(ता.२४) पासून कंत्राटी कामगारांनी स्वेच्छेने कामगार संघटनेमधून राजीनामा दिल्याची घोषणा केली. यानंतर सर्व कंत्राटी कामगार कामावर परतले असून, कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे़ कामगार आयुक्त, स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीबाबत किसान मोल्डिंग्स लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना