येत्या २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात कडाक्याची थंडी

पुणे : मुंबईसह उत्तर कोकणात येत्या २४ तासात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात हवेत गारठा असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली. (Weather in Maharashtra)


https://twitter.com/Hosalikar_KS

सध्या महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. नागरिकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केली असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजाने त्यांना थंडीत आणखी दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई, उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा येत्या २४ तासात अधिक कमी होईल अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तरेकडील किमान तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पुढील दोन दिवसात राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत