येत्या २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात कडाक्याची थंडी

पुणे : मुंबईसह उत्तर कोकणात येत्या २४ तासात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात हवेत गारठा असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली. (Weather in Maharashtra)


https://twitter.com/Hosalikar_KS

सध्या महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. नागरिकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केली असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजाने त्यांना थंडीत आणखी दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई, उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा येत्या २४ तासात अधिक कमी होईल अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तरेकडील किमान तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पुढील दोन दिवसात राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये