येत्या २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात कडाक्याची थंडी

पुणे : मुंबईसह उत्तर कोकणात येत्या २४ तासात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात हवेत गारठा असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली. (Weather in Maharashtra)


https://twitter.com/Hosalikar_KS

सध्या महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. नागरिकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केली असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजाने त्यांना थंडीत आणखी दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई, उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा येत्या २४ तासात अधिक कमी होईल अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तरेकडील किमान तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पुढील दोन दिवसात राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख