येत्या २४ तासात मुंबईसह उत्तर कोकणात कडाक्याची थंडी

पुणे : मुंबईसह उत्तर कोकणात येत्या २४ तासात कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात हवेत गारठा असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली. (Weather in Maharashtra)


https://twitter.com/Hosalikar_KS

सध्या महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. नागरिकांनी गरम कपडे घालण्यास सुरुवात केली असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजाने त्यांना थंडीत आणखी दोन-तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई, उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा येत्या २४ तासात अधिक कमी होईल अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तरेकडील किमान तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पुढील दोन दिवसात राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका