अ‍ॅसिडिटी का होते? त्याच्यावरील सोपे उपाय

मुंबई: करपट ढेकर यायला लागले की आपल्याला लगेच अ‍ॅसिडिटी झाल्याचे समजते. पण ती होऊ नये आणि झाल्यावर काय करावे याबद्दल योग्य माहिती वेळीच मिळणे गरजेचे असते. सध्या धकाधकीच्या आयुष्यात अ‍ॅसिडिटी होतेच. मग अशावेळी काय करायचं हे जाणून घेऊया. अ‍ॅसिडिटीटीवर उपाय करण्याआधी त्याची कारण समजून घेणं महत्वाचं आहे.



अ‍ॅसिडिटीची कारणे-



  • जीवनशैलीतील चुकीच्या सवयी

  • धूम्रपान किंवा मद्यपान

  • मसालेदार पदार्थांचे सेवन

  • व्यायाम न करणे

  • सतत तणाव घेणे


अ‍ॅसिडिटीची कारणे तर आपण जाणून घेतली पण सतत धावपळ केल्यामुळे आपल्याला खाण्या पिण्याच्या वेळा पाळणं जमत नाही आणि अ‍ॅसिडिटी होतेच. आपल्याला अ‍ॅसिडिटीटी झालीच तर त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेऊ.



अ‍ॅसिडिटीची लक्षणे-



  • छातीत जळजळ

  • सतत ढेकर येणे

  • पोटात दुखणे

  • मळमळणे

  • आंबट उलट्या होणे

  • जेवल्यावर पोट फुगणे


अ‍ॅसिडिटी सतत होत राहिल्यास रुग्णाला अल्सर होण्याची शक्यता असते. या रुग्णांना पचनसंस्थेचे कर्करोगदेखील होऊ शकतात.



अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –



  • बराचवेळ उपाशी राहणे टाळावे.

  • मद्यपान, धुम्रपान करु नये.

  • जेवणानंतर शतपावली करावी

  • ध्यानधारण करावी, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो.

  • जेवणात हिरव्या पाले भाज्या खाव्यात.

  • दिवसातील वेळेनुसार आहार घ्यावा

  • रात्री हलका आहार घेणे उत्तम

  • शेवटी आणि सर्वात महत्वाचे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.


(वरील मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण