अ‍ॅसिडिटी का होते? त्याच्यावरील सोपे उपाय

मुंबई: करपट ढेकर यायला लागले की आपल्याला लगेच अ‍ॅसिडिटी झाल्याचे समजते. पण ती होऊ नये आणि झाल्यावर काय करावे याबद्दल योग्य माहिती वेळीच मिळणे गरजेचे असते. सध्या धकाधकीच्या आयुष्यात अ‍ॅसिडिटी होतेच. मग अशावेळी काय करायचं हे जाणून घेऊया. अ‍ॅसिडिटीटीवर उपाय करण्याआधी त्याची कारण समजून घेणं महत्वाचं आहे.



अ‍ॅसिडिटीची कारणे-



  • जीवनशैलीतील चुकीच्या सवयी

  • धूम्रपान किंवा मद्यपान

  • मसालेदार पदार्थांचे सेवन

  • व्यायाम न करणे

  • सतत तणाव घेणे


अ‍ॅसिडिटीची कारणे तर आपण जाणून घेतली पण सतत धावपळ केल्यामुळे आपल्याला खाण्या पिण्याच्या वेळा पाळणं जमत नाही आणि अ‍ॅसिडिटी होतेच. आपल्याला अ‍ॅसिडिटीटी झालीच तर त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेऊ.



अ‍ॅसिडिटीची लक्षणे-



  • छातीत जळजळ

  • सतत ढेकर येणे

  • पोटात दुखणे

  • मळमळणे

  • आंबट उलट्या होणे

  • जेवल्यावर पोट फुगणे


अ‍ॅसिडिटी सतत होत राहिल्यास रुग्णाला अल्सर होण्याची शक्यता असते. या रुग्णांना पचनसंस्थेचे कर्करोगदेखील होऊ शकतात.



अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –



  • बराचवेळ उपाशी राहणे टाळावे.

  • मद्यपान, धुम्रपान करु नये.

  • जेवणानंतर शतपावली करावी

  • ध्यानधारण करावी, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो.

  • जेवणात हिरव्या पाले भाज्या खाव्यात.

  • दिवसातील वेळेनुसार आहार घ्यावा

  • रात्री हलका आहार घेणे उत्तम

  • शेवटी आणि सर्वात महत्वाचे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.


(वरील मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे