शिर्डी जवळ भीषण अपघात, १० ठार, २६ जखमी

मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची तर पंतप्रधानांची दोन लाखांची मदत


सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या अपघाताची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी यांनी दोन लाख तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.



सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. आज पहाटे या बसची आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या बसमध्ये ठाणे उल्हासनगर परिसरातील ४५ प्रवासी प्रवास करत होते. येथील १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला.


दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात जात अपघातग्रस्तांची चौकशी केली. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.



अपघातातील मृतांची नावे



प्रमिला प्रकाश गोंधळी (वय ४५ वर्ष, रा. अबंरनाथ)
वैशाली नरेश उबाळे (वय ३२ वर्ष, रा. अबंरनाथ)
श्रावणी सुहास बारस्कर (वय ३० वर्ष, रा. अबंरनाथ)
श्रध्दा सुहास बारस्कर (वय ४ वर्ष, रा. अबंरनाथ)
नरेश मनोहर उबाळे (वय ३८ वर्ष, रा. अबंरनाथ)
बालाजी कृष्णा महंती (ड्रायव्हर) (वय २५ वर्ष)
दिक्षा संतोष गोंधळी (वय १८ वर्ष, रा. कल्याण)
चांदनी गच्छे
अंशुमन बाबू महंती, वय ७
रोशनी राजेश वाडेकर, वय ३६

Comments
Add Comment

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती