इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहर बायपासच्या सह्याद्रीनगर समोर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात रात्री १० वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाण्याऱ्या टांग्याला आणि दुचाकीला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (वय, २५), कुशल सुधाकर आडोळे (वय, २२) व रोहीत भगीरथ ओडोळे (वय. १९) हे जागीच ठार झाले.
या अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…