मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात तसे संकेत दिले आहेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावाने आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न खासदार शेवाळे यांनी लोकसभेतल्या भाषणादरम्यान उपस्थित केला.
बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए यू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आदित्य-उद्धव असल्याचे खळबळजनक वक्तव्य राहुल शेवाळे यांनी सभागृहात केले. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे.
नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा. ८ जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? सीसीटीव्ही का गायब झाले? विजिटर बूकचे त्या दोन दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
शिवसेनेत झालेल्या बंडात खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळं सध्या ते शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आहेत. आपण आदित्य ठाकरे यांच्यावर कोणताही आरोप केला नसून, एयू म्हणजे नेमकं कोण एवढाच प्रश्न आपण विचारल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…