भाजपाच नंबर वन!

  65

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी ७,६८२ ग्रामपंचायतींतील ६५,९१६ सदस्यांसाठी मतदान झाले. त्यातील १४,०२८ सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचपदासाठी ७६१९ जागांसाठी मतदान झाले. त्यातील ६९९ जणांची बिनविरोध निवड झाली. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. रात्री उशिरापर्यंत अंतीम मतमोजणी झालेली नव्हती. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार या निवडणुकांमध्ये भाजपा तसेच बाळासाहेबांची शिवसेना, यांनी बाजी मारली. या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परंतु निवडून येणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षांचे आहेत, यावर त्या-त्या पक्षांकडून ग्रामपंचायती तसेच सरपंचपदावर दावा केला जातो.


संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीत भाजपाने २०२३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७७२, ठाकरे यांच्या शिवसेनेने ६३९, राष्ट्रवादी काँग्रेसने १२१५, काँग्रेसने ८६१ तर इतर पक्षांनी १,१३५ जागा जिंकल्या. तर सरपंचपदासाठी भाजपाने १४२२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७०९, ठाकरे यांच्या शिवसेनेने ५७१, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८७, काँग्रेसने ६०७ तर इतर पक्षांनी ८८७ जागा जिंकल्या.


उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे. राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा-पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला पसंती दिली आहे. याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा - बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याची खात्री आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील