बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य, सरकार पाठिशी

Share

नागपूर : सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. त्याचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले.

विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी पन्नास खोके-एकदम ओके, अशी घोषणाबाजी करत सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्यासाठी निदर्शने केली.

दरम्यान, बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिले पाहिजे, असे म्हणत सीमावादावर सरकार पाठिशी असल्याचे आश्वासन दिले. शोकप्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावे. त्यांनी सीमावर्ती भागात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. याप्रकरणी लक्ष घालून त्यांना तातडीने सोडायला लावू, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, सीमाप्रश्न हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कृपया यावरून राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत सीमावादावर आमची जी बैठक झाली, त्यात अमित शहांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना महाराष्ट्राविरोधात भूमिका न घेण्याची समज दिली होती. देशात प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर गृहमंत्री अमित शहांनी अशी भूमिका घेतली, याचे खरे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वागत केले पाहीजे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला की, मविआ सरकारनेच सीमाभागातील गावांचा विकासनिधी रोखून धरला होता. त्यांच्या विकासनिधीला स्थगिती दिली होती. आम्ही सत्तेत येताच सीमाभागातील विकासनिधीला मंजुरी दिली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले महाराष्ट्रविरोधी ट्विट कोणी केले, ते ट्विट करणारी व्यक्ति कोणत्या पक्षाची होती, हे लवकरच सभागृहात सांगू, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

11 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

31 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

44 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago