Maharashtra Karnataka Border : कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु

  126

बेळगाव : कर्नाटकातून महाराष्ट्रात बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border) चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली.


ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. कोल्हापूर बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहे. "आता वातावरण निवळले आहे," असे प्रवाशांचे म्हणणे आहे. "तर मराठी आणि कन्नड काही वाद नाही. हा वाद राजकीयदृष्ट्या घडवून आणलेला आहे," अशी प्रतिक्रिया बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. या वादामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे आणखी एका प्रवाशाने म्हटले आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने त्याला महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. यानंतर कर्नाटकच्या बसला दौंड इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती.


सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली.

Comments
Add Comment

ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत ‘अ‍ॅक्शन’मोडवर! शस्त्र खरेदी थांबवली; संरक्षणमंत्र्यांचा वॉशिंग्टन दौरा रद्द

ट्रम्पच्या ५० टक्के करवाढीनंतर मोदी सरकारचा निर्णय नवी दिल्ली : टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, भारताने

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे: -

LPG गॅस वर ३०,००० कोटी रुपयांचे अनुदान : मध्यमवर्गीयांना दिलासा !

नवी दिल्ली : महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . सध्या LPG

अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि विमाने खरेदी करण्यावर भारताचा निर्बंध

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (कर) लावल्यामुळे भारतात असंतोषाचे

मोदी सरकारचे मोठे निर्णय : ५२,६६७ कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी

Union Cabinet Meeting Decision : 'उज्ज्वला' आणि तेल कंपन्यांसाठी भरघोस पॅकेज नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू

महाराष्ट्रातील १५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी परिसरात ढगफुटी झाल्यामुळे पूर आला. सततचा मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे