BCCI : ऋषिकेश कानिटकर भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत घोषणा केली आहे.


९ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी ऋषिकेश कानिटकर संघात सामील होतील, असे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवण्यात आले आहे. ते बंगळुरूमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करणार आहेत.


या नियुक्तीनंतर कानिटकर म्हणाले की, राष्ट्रीय महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला या संघात प्रचंड क्षमता दिसत आहे. आमच्याकडे युवा आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. काही मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि संघासह फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ते रोमांचक असणार आहे.


त्याचवेळी महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पवार म्हणाले की, 'वरिष्ठ महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा अनुभव चांगला आहे. गेल्या काही वर्षांत मी देशातील काही दिग्गज आणि नवोदित प्रतिभांवान खेळांडूसोबत काम केले आहे. एनसीएमधील माझ्या नवीन भूमिकेतील माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे मी उत्सुक आहे. बेंच स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना