chaityabhumi : महामानवाला अभिवादनासाठी उसळली अलोट गर्दी!

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर (chaityabhumi) बाबासाहेबांना अभिवादन केले.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इंदू मिल येथील बाबासाहेबांचे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. नुकतीच आम्ही येथील कामाची पाहणी. जगाला हेवा वाटेल, असे हे स्मारक बनवू. तसेच, बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले राजगृहदेखील आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू, छायात्रित्र, अभ्यासाची खोली आहे. बाबासाहेबांचा हा सर्व ठेवा जोपासला जाईल.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सुरूवातीला बाबासाहेब राहत असलेले लोअर परळ येथेही स्मारकाबाबत पाहणी केली जाईल. बाबासाहेबांच्या सर्व आठवणी व इतिहास जपण्याचे काम हे सरकार करेल.



मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज या महामानवामुळेच आपण जगात ताठ मानेने उभे आहोत. बाबासाहेबांनी घटनेने सर्वसामान्यांना अधिकार प्रदान केले. जगण्याचे हक्क दिले. या अधिकारामुळेच सर्वोच्च अशा पदावर जाऊन राज्याची व देशाची सेवा करण्याची संधी अनेक लोकांना मिळाली. राज्यातदेखील एका सामान्य कुटुंबाचा मुख्यमंत्री झाला. मला राज्याची सेवा करण्याची संधी बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाली. त्यामुळे मी बाबासाहेबांचा सदैव ऋणी राहिल.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महापुरूष इतिहास घडवतात. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास बदलला. दलित समाजातून शतकाचा न्यूनगंड त्यांनी घालवला. आपल्या अथांग अशा विद्वत्तेचा उपयोग दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. मानवमुक्ती हेच त्यांचे ध्येय होते. सामान्य माणूस हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. गुलामगिरीविरोधात विद्रोह करून त्यांनी या लढ्याला प्रचंड असे वैचारिक बळ मिळवून दिले. दलितांना विचारांचे तेच दिले.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकारही बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानुसारच चालत आहे. तळागाळातील सामान्यांना विकासाची समान संधी देणारी व्यवस्था निर्माण करायची आहे. सरकार शासकीय वसतिगृहाची संख्या वाढवणार आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करणार आहे. बार्टीला आणखी सक्षम केले जाईल. दलितांनी स्वंयरोजगार उभारावा, यासाठी सरकार त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करेल.


यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाची दशा आणि दिशा बदलण्याच काम बाबासाहेबांनी केले आहे. व्यक्तीसोबत जात, धर्म, भाषा अशा कोणत्याही आधारे भेदभाव करता येणार नाही, हे बिज मंत्र देणारे संविधान बाबासाहेबांनी दिले. हे संविधान आणि लोकशाहीमुळेच आद देश प्रगती करतोय. सर्वसामान्यांनाही सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी संविधानाने दिली आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील